बीड स्पीड न्यूज
प्रतिनिधी नवनाथ गोरे
त्या कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू
वाकनाथपुर|प्रतिनिधी-: पिंपळनेर येथे माळी कुटुंब आणि गव्हाणे कुटुंब या पाहुण्यांचा घरगुती कारणावरून तीन दिवसापूर्वी वाद झाला होता. वादाचे रुपांतर थेट मारामारीत झाले. या घटनेत दोन्ही गटाकडील तीन ते चार जण जखमी झाले होते.जखमींना बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
त्यातील जखमी राजाभाऊ माळी यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते.या मारामारीच्या घटनेत जखमी झालेले राजाभाऊ माळी (वय 49) यांचा आज सकाळी उपचारा दरम्यान औरंगाबाद येथील रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपींविरोधात 302 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठा जमाव जमला आहे.
0 टिप्पण्या