Subscribe Us

header ads

ऊसाला लावलेल्या तारेचा करंट लागुन शेतकऱ्याचा मृत्यू

बीड स्पीड न्यूज 


ऊसाला लावलेल्या तारेचा करंट लागुन शेतकऱ्याचा मृत्यू

गेवराई - गेवराई तालुक्यातील अर्धामसला येथील शेतकऱ्याने रानडुकरा पासुन संरक्षण साठी ऊसाला लावलेल्या तारेचा करंट लागुन एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास घडली. यात एका शेळीचा देखील शॉक लागुन मृत्यू झाला. (नंदु उद्धव थोपटे वय 40 राहणार अर्धामसला) असे तारेचा करंट लागून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते मंगळवारी सांयकाळच्या सुमारास आपल्या शेतात काम करून घरी येत होते. यावेळी सोबत असलेली शेळी ऊसात गेली. ती शेळी पाहण्यासाठी गेले असता तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.  रानडुकरापासुन संरक्षण मिळावे यासाठी शेतकरी तारेला करंट सोडतात. अशीच तार या ऊसाच्या फडाला लावलेली होती. त्याच तारेचा करंट लागुन शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. यात त्या शेळीचा देखील करंट लागुन मृत्यू झाला. मंगळवार रोजी रात्री शेतकऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला होता. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा