बीड स्पीड न्यूज
प्रतिनिधी नवनाथ गोरे
बीड जिल्ह्यात जोरदार पाऊसाची सुरूवात शेतकरी आनंदात
वाकनाथपुर प्रतिनिधी-: बीड जिल्ह्यात या वर्षी भरपुर पाऊस पडला नाही त्याचं पाऊसावर शेतकऱ्याने खरीप पिके घेतली खरीप पीके जोमात असताना पाऊसाने मात्र विसरांती घेतली मागील पंधरा ते वीस दिवस झाले पाऊस पडला नाही शेतकऱ्यांचे पीक जोमात असताना पाऊस बंद झाल्याने शेतकऱ्यांचे पीक सुकुन जाऊ लागले होते. सर्व शेतकरी चिंतेत होते खुप खर्च झाला कोणी कोणी कर्ज काडले आणि पाऊस जर नाही पडला तर काय होईल या चिंतेने शेतकरी पूर्ण हवालदिल झाला होते. पण आज गणरायाच्या आगमनाच्या वेळी मेघराजाने सर्वत्र जोरदार हजेरी लावली या जोरदार पाऊसाने सर्व शेतकरी आनंदीत आहेत.
0 टिप्पण्या