Subscribe Us

header ads

बीड शहरातील खड्डेमय रस्ते प्रशासनाला झोपेतच ,जागे करण्यासाठी आम आदमी पार्टी दवंडी मोर्चा काढणार-- माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी

बीड स्पीड न्यूज 


बीड शहरातील खड्डेमय रस्ते प्रशासनाला झोपेतच ,जागे करण्यासाठी आम आदमी पार्टी दवंडी मोर्चा काढणार--  माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी              


बीड | प्रतिनिधी -: बीड शहरातील नगर रोड, चह्राटा रोड अंकुश नगर, धानोरा रोड संत नामदेव नगर ,पिंपर गव्हाण रोड बार्शी रोड जालना रोड बांधकाम विभागा अंतर्गत येणारे रस्ते यांची दुरावस्था वेळीच ठीक न केल्यामुळे आम आदमी पार्टीच्या वतीने मोर्चा वाढत आहे. या अगोदर देखील आम आदमी पार्टीने 16/09/21 नगर रोड वरील खड्डे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पोलीस पेट्रोल पंप सतराशे सत्तावीस खड्डे गणना आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत महाराष्ट्र सरकारला व प्रशासनाला अवगत केले होते. त्यामुळे गेल्या वर्षी थोडे बहुत खड्डे बुजण्याचे काम केले देखाव्यासाठी तेही फक्त आणि फक्त गुत्तेदार पोहोचण्यासाठीच बीड शहरातील मुख्य रस्ते असणारे नगर रोड, धानोरा रोड, चह्राटा रोड अंकुश नगर, बार्शी रोड, पांगरी रोड, पिपरगव्हाण रोड, राजीव गांधी चौक ते आदित्य नगरी रोड, बार्शी रोड, जालना रोड, या विषयाला घेऊन आम आदमी पार्टी बीड पाठीमागील एक ते दीड वर्षापासून आपणास निवेदने आंदोलने मोर्चे काढून अवगत करण्याचे काम करत आहे. बीड शहरातील मुख्य रस्ते असणारे  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत आहेत या रस्त्यांची खूप दूर अवस्था झालेली आहे. या रस्त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खूप जास्त त्रास सहन करावा लागत आहे. शाळकरी मुले, वृद्ध,  पेशंट, मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य माणसांचे अपघात होत आहेत दळणवळणासाठी होत असलेल्या अडचणी प्रशासन शासन जनप्रतिनिधी कसल्याही प्रकारची येथील नागरिकांची दखल घेताना  दिसत नाहीत या खड्डे पडलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना मोठमोठ्या अपघातासमोर जावे लागत आहे. यामुळे नागरिक मणक्याचे आजार मानसिक त्रास आरोग्य धोक्यात असल्यामुळे सर्व नागरिक खूप मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत या खराब रस्त्यामुळे नागरिकांना खाजगी दवाखान्यांमध्ये जाऊन आर्थिक व शारीरिक न कधी भरून निघणाऱ्या हानी होत आहेत. आम आदमी पार्टी या विषयाला घेऊन वारंवार निवेदने आंदोलने केली परंतु आपण कसल्याही प्रकारची ज्याप्रमाणे काळजी घ्यायला पाहिजे किंवा दखल घ्यायला पाहिजे ती घेतलेली नाही. या विषयास घेऊन हा मोर्चा निघणार आहे तरीही या रस्त्यांवरती योग्य ते काम करताना दिसले नाही तर बीड शहरातील रिक्षा चालक संघटना, सामान्य नागरिक, वाहतूकदार, शाळकरी मुले, शाळकरी रिक्षा वाहतूक संघटना, ग्रस्त नागरिकांना सोबत घेऊन मोर्चा काढणार आपण याची योग्य ती दखल घ्यावी अन्यथा यामुळे होणारे नुकसान परिणामाची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची असेल हा मोर्चा खड्डा तेथे फुल व दवंडी वाजून काढण्यात येईल मार्ग पवनसुत मंगल कार्यालय पासून सुरू होईल तो दिनांक 19/ 09/ 2022 रोजी सोमवार या दिवशी स.11.00 वा. पवनसुत मंगल कार्यालय बालेपिर नगर रोड बीड ते, जिल्हा अधिकारी कार्यालय बीड यावर काढण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिक रिक्षाचालक बुजुर्ग या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, सचिव रामधन जी जमले, शहर अध्यक्ष सय्यद सादेक, तालुका अध्यक्ष भिमराव कुठे, उपाध्यक्ष आजमखान समाजसेवक, डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर, सामाजिक कार्यकर्त्या किस्किंदाताई पांचाळ, समाजसेवक शेख युनूस चराटकर, शेख मुस्ताक सय्यद, आबेद इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा