Subscribe Us

header ads

कडीनदी वरील बंधाऱ्याचे दरवाजे लावण्याआधी बंधाऱ्याच्या दरवाज्याची दुरुस्ती करावी- सय्यद रहेमान

बीड स्पीड न्यूज 

कडीनदी वरील बंधाऱ्याचे दरवाजे लावण्याआधी बंधाऱ्याच्या दरवाज्याची दुरुस्ती करावी- सय्यद रहेमान

 दरवाज्यातून होणारी पाणी गळती थांबवावी 

कडा (प्रतिनिधी) येथिल हनुमान मंदिर,शनी मंदिर जवळ कोल्हापूरी पद्धतीने बनवलेल्या बंधाऱ्याच्या दरवाज्यातून होणारी पाणी गळती थांबवावी. बंधाऱ्याच्या दरवाज्याची दुरुस्ती करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार आष्टी,जलसंधारण उपविभाग आष्टी यांना शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सय्यद रहेमान यांनी दिले.असून निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, प्लास्टिक कागद (ताडपत्री) टाकुन काही उपयोग होत नाही हे मागच्या दोन वर्षांपासून बघतोय.पाणी गळती होण्याचे मुख्य कारण म्हणजे नुसतेच दरवाजे बंद करायचे म्हणून बंद करायचे ते दरवाजे मग कसेपणे बसू दरवाजे कसे बसले दरवाज्यातून पाणी गळती होत आहे हे पण बघायला पाहिजे ना दरवाज्याची दुरुस्ती केली गेली नाही.कधी ग्रीस,आँइलिंग,दरवाज्याच्या रबरी पट्टे हे सुध्दा कधी बघितले नाही. मागच्या वर्षी हि या बंधाऱ्यातून होणारी पाणी गळती थांबवावी म्हणून जनतेची मागणी होती.तशी वृत्तपत्रात बातमी हि छापुन आली होती तरीही काहिच कारवाही झाली नाही.आपणांस पुन्हा विनंती करतोत की यावर्षी यावेळी दरवाजे (बंद)लावण्या अगोदर बंधाऱ्याच्या दरवाज्यातून होणारी पाणी गळती १००% पुर्णपणे बंद होईल याची काळजी घेऊन संपूर्ण दरवाज्यांची दुरुस्ती  करून द्यावी या मागणीचे निवेदन विभागीय जलसंधारण अधिकारी आष्टी व तहसिलदार आष्टी यांना शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सय्यद रहेमान यांनी दिले आहे.


बंधाऱ्याचे दरवाजे लावूनही पाणी गळती होते तर दरवाजे लावून ही काय उपयोग.पाणी गळती थांबवावी याकरिता संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ  बंधाऱ्याच्या दरवाज्याची दुरुस्ती करून पाणी गळती होणार नाही याची दखल घ्यावी व वाया जाणारे पाणी वाचवावे.*
रविंद्र ढोबळे
आष्टी तालुकाध्यक्ष
राष्ट्रीय काँग्रेस पक्ष

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा