बीड | प्रतिनिधी-: मातंग समाज आजही अंधश्रद्धा मध्ये अडकलेला दिसून येत आहे समाजाने अंधश्रद्धेला नाकारून महात्मा फुले ,शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार स्विकारून आपली प्रगती करावी असे म्हटले आहे . तिपटवाडी येथे क्रांतिवीर लहुजी समता परिषदेची शाखा स्थापन करण्यात आली त्याप्रसंगी अशोक सोनवणे समाजाला मार्गदर्शन केले . क्रांतिवीर लहुजी समता परिषदेच्या शाखेचे उद्घाटन युवानेते विनोद (दादा) हातागळे यांच्या हस्ते करण्यात आले .
याप्रसंगी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष लालासाहेब स्वप्नील हातागळे ,कृष्णा पाटोळे उपस्थित होते. देव धर्माच्या अंधश्रद्धेच्या विचारातून बाहेर आले आलेला नाही म्हणून आमची शैक्षणिक, आर्थिक परिस्थिती सुधारलेली नाही भविष्यकाळात आपल्याला पुढच्या पिडीचे भविष्य चांगले घडवायचे असेल तर सर्व महामानवाचे विचार स्वीकारून नवीन समाज निर्माण करून आपली प्रगती करावी .याप्रसंगी युवा नेते विनोद दादा हातागळे संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष लालासाहेब दनघव , जिल्हाध्यक्ष स्वप्नील हातागळे व ग्रामपंचायत सदस्य भोसले,पवळ ,महिला मंडळ व गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते.याप्रसंगी क्रांतिवीर लहुजी समता परिषद शाखा क्रांतिकारनीची निवड करण्यात आली.
0 टिप्पण्या