Subscribe Us

header ads

गेवराई तालुक्यातील भोजगाव येथे मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

गेवराई_ तालुक्यातील भोजगाव येथे निकीता संत (वय १८) वर्ष या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी (दि.२४) ही घटना घडली, तिने आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे मात्र अस्पष्ट आहे. दरम्यान अमृता नदीवरील पुल गेल्या अनेक वर्षांपासून वाहुन गेलेला आहे त्यामुळे नातेवाईकांना मृतदेह खांद्यावर उचलून शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाण्याची वेळ आली. सदरील घटनेची माहिती मिळताच गेवराई ठाण्याचे बीट जमादार सतिष खरात यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी उमापुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला.दरम्यान अमृता नदीवरील पुल वाहुन गेलेले काही वर्ष लोटले आहेत.परिणामी भोजगावातील नागरिकांना सूख दुःखाच्या वेळी अशी कसरत करावी लागत आहे. घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे मात्र याची जाण लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाला येईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा