Subscribe Us

header ads

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय ) कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा -- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश

लॉकडाऊन येऊ द्यायचा नाही या निर्धाराने आरोग्याचे नियम पाळा

विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे देखील निर्देश

----------------------


'कुछ नही होता यारहे अजिबात चालणार नाही

मुंबईदि. 28: कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहेमात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्ह्णून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावीपरत एकदा संसर्गाचा वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाहीत्यामुळे परत लॉकडाऊन लागू द्यायचा नाही या निर्धाराने  नियमित मास्क वापरणेअनावश्यक गर्दी  करणेसुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावीत लागतील असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घेणेविशेषतः विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय  देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करणे यादृष्टीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिलेयासंदर्भात केंद्राकडून येणाऱ्या सूचनांची वाट  पाहता युद्धपातळीवर जे जे गरजेचे वाटते ते निर्णय घेऊन आवश्यक पाऊले लगेच टाकावीत असेही त्यांनी स्पष्ट केले.

            आपल्या सर्वांमधीलच बेसावधपणा वाढला आहे. "कुछ नही होता यारअसा पवित्रा मोठ्या संकटात टाकू शकतो असे सावधगिरीचे बोल सांगून मुख्यमंत्री म्हणाले की मास्क  वापरणे आणि नियम तोडून अनावश्यक गर्दी करणे यावर काटेकोर कारवाई झालीच पाहिजे असे पहा.

करोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित प्रकारामूळे संसर्गाचा धोका वाढणार असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी कुठल्या उपाययोजना करता येतील याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्तजिल्हाधिकारीपोलीस आयुक्तपोलीस अधीक्षकमुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतलीत्यावेळी ते बोलत होतेयावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपेवैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुखराज्याच्या टास्क फोर्सचे डॉ संजय ओकडॉ शशांक जोशीडॉ राहुल पंडितडॉ अजित देसाईडॉ खुस्राव्ह बजानडॉ केदार तोरस्करडॉ झहीर अविराणी , डॉ वसंत नागवेकरडॉ नितीन कर्णिकमुख्य सचिव सीताराम कुंटेप्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यासमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंहमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदींची उपस्थिती होती.

            राज्य सरकारला दोन वर्षे पूर्ण झालीयामध्ये प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या प्रारंभी सर्व अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले.

ऑक्सिजनऔषध उपलब्धता तपासाअग्निसुरक्षा ऑडिट पूर्ण करा

            कोविडशी अव्याहतपणे लढत असल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी प्रशासनातील सर्वांचे कौतुक केलेते म्हणाले कीनवा व्हेरिएंट हा उंबरठा ओलांडून आला आहे का हे काळजीपूर्वक पाहावे लागेलदोन्ही लाटांमध्ये आपल्याला कुठं कमी पडलो ते कळत होतेऑक्सिजनचा साठा वाढविण्यासाठी धावपळ करावी लागली होती.  त्यामुळे आता या नव्या विषाणू प्रकारामुळे शहरे असो किंवा दुर्गम भागातली रुग्णालये असोतआपल्याला ऑक्सिजन निर्मितीऑक्सिजन साठाआगीच्या घटना घडू नयेत म्ह्णून अग्निसुरक्षा तसेच स्थापत्य विषयक ऑडिटऔषधांची उपलब्धता हे सर्व प्रत्येक जिल्हा प्रशासनाने जातीने पाहावे.

मास्क आवश्यकचअनावश्यक गर्दी होऊ देऊ नका

            महाराष्ट्रातील जनता समजूतदार आहेयापूर्वीही सरकारच्या सर्व सूचनांचे पालन त्यांनी केले आहेकोविडचे रुग्ण कमी झाल्यामुळे लोकांमध्ये बेसावधपणा आला आहेया विषाणूशी कसे लढायचे , कोणते उपचार करावेत हा नंतरचा भाग झाला पण मुळात हा संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर मास्क अनिवार्य आहेच असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कीआता लग्नसराईचे दिवस आहेतमित्रआप्तेष्ट परदेशातून देखील येतील त्यामुळे आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा