Subscribe Us

header ads

रात्रीची लाईट शेतकऱ्यांच्या जिवावर उठली ; शेतात ज्वारीला पाणी देण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू.

बीड स्पीड न्यूज 

बीड_ रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी शेताच्या कुंपणात शेतकऱ्याने वीज सोडली असता संबंधित शेतकऱ्याच्या शेजारच्या शेतकऱ्याला याची मोठी किंमत मोजावी लागली. रात्रीच्या दरम्यान ज्वारीला पाणी देत असताना विजेचा प्रवाह असलेल्या तारेला हात लागल्याने एका शेतकऱ्याला शॉक लागला असता त्याचा भाऊ त्याच्या मदतीला धावला. मात्र दुर्दैवाने दोघांनाही विजेचा शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पाटोदा तालुक्यातील नाळवंडी येथे घडली. या दुर्दैवी घटनेने मोठी हळहळ व्यक्त होत असून रात्रीच्या लाईटमुळेच हि दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात आहे. हुसेन फकीरभाई शेख व जाफर फकीरभाई शेख असे मृत्यू झालेल्या शेतकरी भावांची नावे आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा