Subscribe Us

header ads

जनतेच्या प्रेमातून आणि आशिर्वादातुन उतराई होवू शकत नाही शिरापुर धुमाळ येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

बीड स्पीड न्यूज 

नवगण राजुरी (प्रतिनिधी): या भागातील जनतेने स्व.काकू-नानापासुन दादांवर व माझ्यावर नेहमी प्रेम व आशिर्वाद दिले आहेत. त्या प्रेमातून आणि आशिर्वादातून उतराई होवू शकत नाही. या गावांच्या विकासासाठी व माझ्या प्रेमाच्या माणसांसाठी सदैव प्रयत्नशिल राहून या भागांचा विकास करेल असे प्रतिपादन आ.संदिप क्षीरसागर यांनी केले आहे. शिरापुर धुमाळ येथील विविध विकास कामांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते 

गावकर्‍यांच्या उपस्थित करण्यात आल्यानंतर ते बोलत होते. मंगळवार दि.30 नोव्हेंबर रोजी रायमोहा जि.प.गटातील शिरापुर धुमाळ येथील विविध विकास कामांचा शुभारंभ गावकर्‍यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गजानन कारखान्याचे चेअरमन रविंद्र दादा क्षीरसागर यांची विशेष उपस्थिती होती. या भागातील जनतेने प्रेम आणि आशिर्वाद जे दिले आहेत त्यातून उतराई कधीच होवू शकत नाही. या भागाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशिल राहिल अशी ग्वाही आ.संदिप क्षीरसागर यांनी दिली आहे. यावेळी शिरापुर धुमाळ येथे ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा