बीड स्पीड न्यूज
मांजरसुंबा महसुल मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. परंतु या भागातील 23 गावांमधील शेतकर्यांना अनुदान मंजूर झालेले नाही. जिल्ह्यात इतर ठिकाणी हे अनुदान शेतकर्यांच्या खात्यात जमा होत असतांना मांजरसुंबा महसुल मंडळात मात्र याबाबतची कार्यवाही झालेली नाही. या शेतकर्यांना तात्काळ अनुदान मंजूर करण्याची मागणी दि.3 नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. येत्या पाच दिवसात अनुदान मंजूर न झाल्यास सोलापूर - धुळे महामार्गावर मंझरी फाटा येथे शेतकर्यांसह रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा सरपंच तथा सरपंच परिषदेचे बीड जिल्हा समन्वयक अंबादास गुजर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी सफे पुरचे सरपंच श्रीराम घोडके तांदळवाडीचे सरपंच पोपट काळे, महारुद्र वाघ (खडकीघाट), विलास गावडे (बोरखेड), नानासाहेब घलाळ (रत्नागिरी), मिनाबाई बहिरवाल (मांडवजली), स्मिता चौरे (खंडाळा), लालासाहेब सालगुडे (भांडरवाडी), राजकुमार कदम (ससेवाडी) यांच्यासह शेतकरी संतोष डोंगर, तुकाराम धसे,बप्पा गुजर,समीर पठाण, तुकाराम डोंगर, बबन बहिरवाळ, संदीप पाटील,गजानन बहिरवाळ, बाबासाहेब बहिवाळ, पप्पु बहिरवाल, कदम पंडित,रसाळ बाळासाहेब,सचिन काळकुटे, अमोल गुजर, हनुमान घोशीर,सुरेश मुसळे,वराडे , राजेंद्र बहिरवाळ,बाबुराव धसे, रावसाहेब गुजर उपस्थित होते.
आंदोलनाला पाठींबा
अतिवृष्टी अनुदानाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या या आंदोलनाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेनेचे तालुकाप्रमुख गोरख शिंगण, शिवसंग्रामचे युवा नेते रामहरी मेटे, धनंजय गुंदेकर, गणेश ढवळे ,यांनी तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या प्रतिनिधींनी भेट दिली.
0 टिप्पण्या