बीड स्पीड न्यूज
जालना -: जालना जिल्ह्यातील विविध प्रकारच्या हजारोच्या संख्येने दिव्यांग असून दिव्यांगसाठी ठोस असे कोणतेही धोरण शासनाने राबविलेले नाही. व दिव्यांगाचे कायदे जीआर हे कागदपत्रे राहिलेले आहेत. तसेच सन 1995 चा अपंग पुनर्वसन कायदा सन 2001 चे महाराष्ट्राचे दिव्यांग धोरण व सन 2016 चा अपंग हक्क संरक्षण कायदा याची देखील अमोलबजावणी होत नाही याकरिता दिव्यांगाच्या संपूर्ण कल्याण व पुनर्वसनासाठी महाराष्ट्र शासनाने महिला बालकल्याण व मागासवर्गीय मंत्रालय प्रमाणे दिव्यांगाचे स्वतंत्र मंत्रालय व विभाग तयार करावा यासाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री माननीय आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशानुसार तसेच प्रहार अपंग संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मा बापूराव काने साहेब व राज्य संपर्कप्रमुख रामदास खोत साहेब व मराठवाडा अध्यक्ष शिवाजी गाडे साहेब यांच्या यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे 25 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहावे. असे आव्हान अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना जिल्हाध्यक्ष विठ्ठल चव्हाण शंकर शिरगुळे व मा जि हनुमान माने बाळासाहेब होडबे रवींद्र अंभोरे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर आडे माऊली कदम आबाजी भुंबर शेख फिरोज यांनी केले आहे.
0 टिप्पण्या