महाराष्ट्राची सायली कांबळे तिसऱ्या क्रमांकावर
मागील वर्षभरापासून गायन क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी अनेकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यानंतर शेवटच्या सहा स्पर्धकांमध्ये आज चुरस रंगली. यामध्ये पवनदीपने बाजी मारली, तर दुसऱ्या स्थानी अरुणिताने बाजी मारली. महाराष्ट्रच्या सायली कांबळेला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. चौथा क्रमांक मोहम्मद दानिश, पाचवा क्रमांक निहाल तोरोने मिळविला, तर षण्मुखा प्रिया सहाव्या स्थानावर राहिली.
कोण आहे पवनदीप राजन?
‘इंडियन आयडॉल १२’च्या एका भागात बप्पी लहरी यांनी पवनदीपला सोन्याची साखळी भेट दिली होती. हिमेश रेशमियाने त्याला एक नाही तर १० गाण्यांची ऑफर दिली आहे. पवनदीप राजन मूळचा उत्तराखंडमधील कुमाऊंचा राहणारा आहे. संगीताचा वारसा त्याला घरातच मिळाला. पवनदीपचे वडील आणि काका यांनी त्याला बालपणापासून संगीताची शिक्षा दिली. त्याचे आजोबा त्या काळातील प्रसिद्ध लोककलावंत होते. पवनदीपने याआधीही एक सिंगींग रिअॅलिटी शो जिंकला आहे. २०१५ साली ‘व्हॉईस इंडिया’च्या पहिल्या सीझनचा तो विजेता होता. केवळ दोन वर्षाचा असताना पवनदीपने एक विक्रम रचला होता. लहानपणापासून पवनदीप तबला वाजवतो. दोन-अडीच वर्षाचा असताना त्याला सर्वाधिक कमी वयाचा तबलावादक म्हणून गौरविण्यात आले होते, तबल्याशिवाय पियानो, ढोलकी, की-बोर्ड, गिटार इत्यादी वाद्य तो वाजवतो. पवनदीप म्युझिक डायरेक्टरही आहे.देशविदेशात त्याने अनेक लाईव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म केला आहे. पवनदीपने आत्तापर्यंत १३ देशांत आणि भारताच्या १४ राज्यांत सुमारे १२०० शो केले आहेत. इतक्या कमी वयात इतकी मोठी कामगिरी केल्याने उत्तराखंड सरकारने पवनदीपला ‘युथ अॅम्बॅसिडर ऑफ उत्तराखंड’ या किताबाने गौरविले होते.
0 टिप्पण्या