गेवराई_ भोजगाव येथे दोन दुदैवी घटना घडलेल्या असल्याने बीड जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी आज संत कुटुंबाच्या मदतीला धावले . गावालगत असलेल्या अमृता नदीला पुल नसल्याने त्या पुलावर सुदर्शन संत यांचा नदी पार करत असताना कठड्यावर पाय घसरल्याने त्या नदीच्या पुरात वाहून दुदैवी मृत्यू झाला होता, व त्या आगोदर दोन दिवसांपूर्वी निकिता संत या तरूणीने आत्महत्या केली होती, त्या तरुणीचा शवविच्छेदन करण्यासाठी चक्क बापाला अमृता नदीला पुल नसल्याने ती नदी पार करावी लागली, या घटनेचा महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त होत आहे, आणि गतवर्षी ही त्याच अमृता नदीवरून प्रवास करताना एक जणाचा मृत्यू झाला होता, अजून ही त्याअमृता नदीवरून ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे, अजून किती बळी गेल्यावर हा पुल करण्यात येईल व प्रशासन लोकप्रतिनिधींना जाग येईल असा प्रश्न ग्रामस्थ करित आहेत, त्यामुळे आज बीड चे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी सुदर्शन संत च्या कुटुंबीयांना ४ लाखाची मदत केली आहे, व भोजगाव या गावात ट्रॅक्टर मध्ये प्रवास करून गावाची पहाणी केली, व ग्रामस्थां सोबत सवांद साधला
0 टिप्पण्या