बीड स्पीड न्यूज
तुम्ही तुमच्या घरात बसून घरच्यांसाठी अल्टिमेटम द्या, आम्हाला सांगू नका---उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्यात तणाव निर्माण होऊ नये म्हणून गृहखात्याने पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे राज्यात तणाव निर्माण होणार नाही यासाठी जनतेने सरकारला आणि पोलिसांना शांतता व सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी मदत करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांनी केलं. तीन तारखेला अक्षय्य तृतीयेच्या दिवशीही या प्रकरणाची बरीच चर्चा झाली होती. पण कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर पोलिस कारवाई करणार आहेत. तसेच उत्तरप्रदेशच्या जहांगीरपुरीतल्या मंदीरावरील आणि मशिदीवरीलही भोंगें काढले आहेत. तिथे कुठलेही आदेश दिले नव्हते, त्यांनी फक्त लोकांना आवाहन केलं आणि तेथील लोकांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. असं ते बोलताना म्हणाले आहेत.सुप्रीम कोर्टाने २००५ साली निकाल देऊन आवाजाची मर्यादा लागू केलेली आहे. लोकांनी कोर्टाच्या नियमांचे पालन करावे आणि अजूनही ज्या मंदिरांच्या आणि मशिदीच्या भोंग्यांना परवानगी घेतलेली नसेल त्यांनी ती कायदेशीररित्या काढून घ्यावी असं म्हणत कायदा कुणी हातात घेऊ नये असा इशारा त्यांनी दिला.अगोदर सगळं काही चागलं सुरू होतं. आता हा विषय पुढे आला आणि सगळं काही बिघडलं. शिर्डीच्या साईबाबा मंदीरातली काकड आरतीही आता बंद झाली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचं तंतोतंत पालन करायचं असेल तर हे होणारंच. असाही टोला त्यांनी लावला आहे.
0 टिप्पण्या