यांनी भेटी देवुन शेतकर्यांच्या पिकांची पाहणी केली. अक्षरक्षा: सोयाबीन, मुग, तुर, कापूस आदी पिके पावसामुळे वाहून गेली आहेत. यामुळे माझा शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षापासुन विविध संकटांला तोंड देवून आर्थिक संकटात सापडला आहे. म्हणून राज्य सरकारने तात्काळ पिकांची पाहणी करून त्यांना आर्थिक मदत द्यावी. येत्या आठ दिवसात आर्थिक मदत शेतकर्यांच्या खात्यावर जमा झाली नाही तर आम्ही माझ्या शेतकर्यांच्या मदतीसाठी तीव्र आंदोलन करेल, वेळप्रसंगी हातात नांगर घेवून शासनाच्या विरोधात लोकशाही पध्दतीने आंदोलन करू असाही इशारा फुलचंद कराड यांनी दिला. परळी तालुक्यातील लिंबोटा, पांगरी, गाढेपिंपळगाव, नाथ्रा, सेलू, परचुंडी, भिलेगाव, लिंबोटा तांडा आदी गावांना भेटी देवून शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली, शेतकर्यांना दिलासा दिला. तसेच शेतकर्यांना तात्काळ मदत द्यावी. यावेळी फुलचंद कराड यांच्या समवेत मंचक मुंडे, इंद्रमोहन मुंडे, रत्नहार कराड, केशव कराड, बाबुराव कराड, विलास कराड, राजाभाऊ पांचाळ, अॅड.बालाजी कराड, प्रशांत कराड, रवि कराड, बिभीषण गित्ते, आत्माराम गित्ते, बाबुराव राठोड, प्रकाश राठोड, माणिक कडभाने, विकास कडभाने, महादेव कडभाने, बाबुराव कडभाने, मारोती कडभाने, प्रकाश राठोड, बबन जाधव, नितीन जाधव, रंगनाथ घुले, बाळासाहेब जाधव, इंद्रजीत मुंडे, दत्तुआबा मुंडे, तलाठी सलीम शेख, तलाठी साबणे यांच्यासह आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या