(किल्ले धारूर प्रतीनीधी) सतत सुरू असलेल्या संततधार व मुसळधार अतीवृष्टिच्या पावसाने बीड जिल्ह्यातील सर्वदूर पिकांचे व सार्वजनिक मालमत्तेचे आतोनात नुकसान झाले आहे आगोदरच आपल्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने बळीराजा हतबल झालेला यात परत निसर्गाच्या लहरीपणामुळे तो आणखीण मेटाकुटीला आलेला आहे
त्यात शासनाने व प्रशासनाने शेतातील पिकाच्या नुकसानीच्या पंचनाम्याचा फार्स करता बीड जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करुण सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये तातडीची मदत द्यावी वाहुन गेलेले रस्ते व फुले यांची दुरुस्ती करावी असी मागणी बीड जिल्हा प्रहार संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ तोंडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे बीड जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून परत एकदा मुसळधार पावसाने थैमान घातले असुन याठिकाणी दुसऱ्यांदा ढगफुटीसद्रषय अतीवृष्टि झाल्यने सर्वत्र हाहाकार माजला आहे जिल्ह्यातील सर्व नदि तलाव ओहरल्पौ झाले आहेत तर काही ठिकाणी पुलावरून पाणी जाऊ लागल्याने अनेक गावांच्या संपर्क तुटला आहे तर ठिकाणी रस्ते व फुलेच वाहुन गेले आहेत शेतात तयार कपाशी भिजुन तिला कोब फुटत आहेत तसेच कपाशीची बोंडे सडत आहेत करीता शासनाने पंचनामे चा फार्स न करता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार ची मदत करावी मागणी बीड जिल्हा प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष रघुनाथ तोंडे अशोक सोनवणे विठ्ठल मुंडे रमेश चव्हाण संतोष आघाव पदमीन तारडे भास्कर केदार विक्रम मोमीन नंदकुमार झाडे बालाजी घोळवे महादेव कांगणे उद्धव ग यांच्यासह बीड जिल्हा प्रहार सैनिकांनी केली आहे.
0 टिप्पण्या