प्रतिनिधी नवनाथ गोरे
♦♦♦♦♦♦
वाकनाथपुर प्रतिनिधी_या वर्षी पाऊस पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.पाऊसा बरोबर वीज पडण्याच्या घटनाही खूप घडत आहेत.वीज पडल्याने कित्येक जीव गेले आहेत.आज दिनांक ९ ऑक्टोंबर रोजी सायकाळी ६: ३० च्या दरम्यान कुक्कडगाव येथे असणारे 33/11 के.व्ही. विद्युत ऊपकेंद्र येथे वीज पडल्याने मोठ्या प्रमाणात विद्युत उपकरणांचे नुकसान झाले आहे. वीज पडली त्या वेळेस ऑपरेटर गाडे हे ड्युटीवर असल्याने ते थोडक्यात बचावले विज पडल्याने जोराचा आवाज झाल्याने कुक्कडगाव येथील घरची भिंत देखील पडली आहे. सुदैवाने कोणालाही जखम झाली नाही विजेची तीव्रता अधिक असल्याने म्हाळस जवळा येथील विद्युत (उपकेंद्र) येथे ही मोठा आवाज झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. वीज पडल्याने २० ते ३० गावे आज अंधारात आहेत. लवकरात लवकर विज पुरवठा सुरळीत करू असे वीज वितरण कंपनीचे कर्मचारी यांनी सांगितले आहे.
0 टिप्पण्या